

crime
ESakal
शहापूर : तालुक्यातील एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २१ विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आहे. आदिवासी विकास प्रकल्प विभागाने विद्यार्थिनींच्या विनयभंगाची तक्रार दडपल्याचा ठपका अधीक्षिका गौरी सारक्ते यांच्यावर ठेवला असून या घटनेला त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. तर मुलींचा विनयभंग करणारा स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत गवळी याला निलंबित केले आहे. विशेष म्हणजे, अशाच गुन्ह्यातून गवळी याची निलंबित होण्याची ही दुसरी वेळ आहे.