ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण 92 टक्के

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरण परिसरात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस होत आहे. पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, 92.58 टक्के धरण भरले आहे.
barvi dam
barvi damsakal

डोंबिवली : ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरण परिसरात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस होत आहे. पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, 92.58 टक्के धरण भरले आहे. धरण परिसरात आत्तापर्यंत 1947 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात बारवी धरण भरण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र पावसाने दिलेल्या उघडीपमुळे धरण भरण्यास उशीर झाला आहे. 92 टक्के धरण भरल्याने पाणी टंचाईची समस्या उदभवणार नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

barvi dam
बदलापूरात सहाय्यक आयुक्तांवरील हल्ल्याचा निषेध

बारवी धरणातून ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी महापालिकांना, औद्योगिक विभागास पाणी पुरवठा केला जातो. पाऊस चांगला झाल्यास बारवी धरण साधारण ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेने भरते. जुलै महिन्यात शेवटी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्ट महिन्यात धरण भरण्याची शक्यता वर्तविली जात होती.

मात्र पावसाने ओढ देत सर्वच शक्यतांवर पाणी फेरले. गेल्या दोन तीन दिवसांपासून धरण परिसरात पावसास चांगली सुरवात झाली असून धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी धरणातील पाण्याची पातळी 71.84 मी असून 92.58 टक्के धरण भरले आहे.

2019 साली 4 ऑगस्टला तर 2020 साली 31 ऑगस्टला धरण पूर्ण क्षमतेने भरले. यंदा सप्टेंबर महिना उजाडला असून अद्यापही धरण 92 टक्केच भरले आहे. महिनाभराच्या उघडीपनंतर पुन्हा दोन दिवसांपासून पावसाला सुरवात झाल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. 92 टक्के धरण भरल्याने पुढील वर्षाची पाणी टंचाईची समस्या सुटल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com