
ST Employees Helps Farmers
ESakal
डोंबिवली : बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी- महापूरामुळे बळीराजा फार मोठ्या आस्मानी संकटात सापडला असून एसटीच्या कल्याण आगारातील 50 चालक-वाहक कर्मचारी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांनी शेतकरी बांधवांप्रती माणुसकी जपत आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केला आहे.