

Thane Water Scarcity
Esakal
ठाणे : ठाणे शहरात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे संकट तीव्र होत असून महापालिकेला दररोज टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. स्वतःचे धरण नसल्याने दरवर्षी निर्माण होणारी ही समस्या यंदाही कायम असून शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एप्रिल महिन्यात सध्या शहरातील विविध भागांत दररोज सरासरी ७५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. विशेषतः घोडबंदर, दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.