राज्य सरकारने लसवंतांना तिकिट देण्याचा निर्णय घ्यावा, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

लसवंतांना लोकल तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण
Mumbai
Mumbaisakal
Updated on

मुंबई : राज्य सरकारकडून 'संपूर्ण लसीकरण' असा नवीन गट तयार केला आहे. या गटात ज्या नागरिकांनी ​दोन्ही डोस घेतले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत, असे नागरिक मोडत आहेत. या 'संपूर्ण लसीकरण' गटातील प्रवाशांना लोकलचे मासिक पास, तीन आणि सहा महिन्यांचा पास देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्य सरकारकडून लसवंतांना तिकिट देण्याबाबत रेल्वे प्रशासनाला कोणत्याही सुचना देण्यात आल्या नाहीत. परिणामी, प्रवासी वर्गात राज्य सरकारविषयी संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे.

राज्य सरकारने मंगळवारी, (ता.26) रोजी जाहिर केलेल्या परिपत्रकात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दैनंदिन लोकल तिकिट न देण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त मासिक, त्रैमासिक, सहामाही पास देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची देखील लोकल प्रवास करताना गोची होणार आहे. महत्त्वाच्या कामानिमित्त एका दिवसासाठी लोकल प्रवास करण्यासाठी मासिक पास काढायचा का, असा प्रश्न प्रवासी संघटनेकडून विचारण्यात येत आहे. अनेक प्रवाशांचे दैनंदिन काम अनेक रेल्वे मार्गावरून होते. मात्र, पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गाचे सिंगल पास मिळत नसल्याने दोन किंवा तीन पास प्रवाशांना काढावे लागतात. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. उदा. अंधेरी ते चर्चगेट आणि सीएसएमटी पास मिळतो. मात्र, अंधेरी ते चर्चगेट, ठाणे ते सीएसएमटी असा एकच पास मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना दोन पास काढावे लागतात. तर, जे ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तीन पास देखील काढावे लागतात. त्यामुळे राज्य सरकाराने सर्व रेल्वे प्रवाशांचा अभ्यास करावा, त्यानंतर आता पुढील निर्णय घ्यावा, असा टोला प्रवासी संघटनेकडून राज्य सरकारला लगावला आहे.

Mumbai
रेल्वेच्या पासधारकांसाठी खुशखबर ! प्रवासासाठी पास देण्यास राज्य सरकारची मान्यता !

केंद्र सरकारने रेल्वेचा कारभार हातात घेतला पाहिजे. त्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधेप्रमाणे रेल्वे चालविण्यात आली पाहिजे. राज्य सरकारचा लोकलबाबत नेमका काय विचार आहे, याबाबत शंका उपस्थित होत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे राजकारण सुरू आहे का ? कारण सर्वसामान्य नागरिकांचे खूप हाल होत आहेत. मात्र, सरकारकडून कोणताही सकारात्मक निर्णय घेतला जात नाही. महिन्यांतून बोटावर मोजण्याइतक्या दिवस प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक पास काढून आर्थिक नुकसान सोसावा लागत आहे. सध्या आता समाज माध्यामावरूनच सरकार, रेल्वे प्रशासनाला निवेदन करून लसवंतांना लोकल प्रवास खुला करण्याची मागणी केली जात आहे.

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Mumbai
Pune : पावसामुळे जात पडताळणी कार्यालयातील प्रस्ताव खराब

राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला निर्देश दिले जात आहेत. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासन काम करत आहे. मात्र, एकत्रित पास रे्लवेकडून मिळत नाही, हे राज्य सरकारला माहिती नाही. परिणामी, लसवंतांना मासिक पास देण्याची मुभा दिली असताना देखील एकाच वेळी तीन ते चार रेल्वे मार्गिकेवरून प्रवास करता येत नाही. राज्य सरकार कोणत्याही रेल्वे प्रवासी संघटनेला विश्वासात घेत नाही. स्वतः निर्णय घेऊन सर्वसामान्यांवर थोपावत आहेत. बेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यावर कोणतेही बंधने नाहीत. लसवंतांना तिकिटांची सुविधा उपलब्ध नसल्याने खासगी वाहनधारकांना फायदा घेत आहे. अवाजवी भाडे घेऊन प्रवाशांची लूट करत आहेत.

- सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा- पारसिक प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com