नोकऱ्या आहेत; मात्र त्याला लायक अभ्यासक्रम आहे का? : आदित्य ठाकरे

Aditya_Thackeray
Aditya_Thackeray

कल्याण : आज बेरोजगारी वाढत चालली आहे. देशात नोकऱ्या उपलब्ध आहेत, मात्र त्याला लायक अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध आहे का? सध्या शिक्षण क्षेत्रात नवीन पॉलिसी येत असून त्यानुसार शिक्षण क्षेत्र बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (गुरुवार) कल्याणमधील एका कार्यक्रमात केले.

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रातील 'स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड अल्पाइड सायन्स' विभागाचे उद्घाटन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर विनिता राणे, आमदार निरंजन डावखरे, राज्यमंत्री रविंद्र वायकर, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, कुलगुरू सुहास पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भाषणात आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा कुलुगुरू चांगले मिळाले असून आम्हाला आंदोलन करावे लागले नाही. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये विद्यापीठाचे काम चांगले सुरू असून त्याने वेग पकडला आहे. ते पुढे म्हणाले की, माहिती सर्वांकडे असते, मात्र त्याचा वापर बुद्धीमध्ये झाला, तर त्याची ताकद वाढते. आपले शिक्षण मुलभूत होणे आवश्यक असल्याचे सांगत, या उपकेंद्रासाठी अनेक आंदोलने झाल्याची आठवण ठाकरे यांनी सांगितली.

या उपकेंद्रात इनोव्हेशन आणि अर्बन टाऊन प्लॅनिंगसंदर्भात लॅब सुरू करणे आवश्यक आहे. कारण यापुढे जगभरात कोणतीही डावी-उजवी विचारसरणी अस्तित्वात राहणार नाही. लोकांचा त्रास कसा कमी करता येईल, यावरच सर्वांचा भर असणार आहे. आपल्या विद्यापीठाद्वारे मुलभूत गोष्टी देशभरात पोचतील, अशा पद्धतीने काम करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर विनिता राणे, कुलुगुरू सुहास पेडणेकर, राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची भाषणे झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com