

Third Mumbai Development
ESakal
नवी मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘तिसरी मुंबई’ या प्रस्तावित नव्या शहरासाठीच्या भूधोरणाला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तिसऱ्या मुंबईची पायाभरणीचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाळा-साई-चिरनेर नवनगर प्रकल्पासाठी सर्वसमावेशक भूधोरणाला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजित विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. या धोरणांतर्गत सिडकोच्या २२.५ टक्के योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे समजते.