water scarity
water scarityesakal

विरार : पाण्यासाठी जनाक्रोश आंदोलन

भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कार्यालयावर नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन

विरार : वसई, विरार शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. अनेक भागात चार ते पाच दिवसानंतर पाणी येते; मात्र पालिकेकडून वर्षभराची पाणीपट्टी घेतली जाते. शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कार्यालयावर नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन केले.

काही वर्षात वसई, विरार शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे; मात्र त्या प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत; मात्र पालिका प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात न आल्याने भाजप वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक, विरार शहर अध्यक्ष नारायण मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. जनआक्रोश आंदोलनामध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

समस्या सोडविण्याचे आश्‍वासन
शहरातील प्रत्येक भागामध्ये एक दिवसाआड पाणी येईल आणि पाण्याचा दाब वाढविण्यात येईल. पाण्यासंदर्भातील समस्यांचे निवारण करण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे, अधिकारी आशिष पाटील, अभियंता राजेंद्र लाड, सुरेंद्र ठाकरे यांनी आश्‍वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com