देशात निरपेक्ष भूमिका मांडणाऱ्यांची गरज

देशात निरपेक्ष भूमिका मांडणाऱ्यांची गरज

अलिबाग, ता. २८ (बातमीदार) ः देशातील कारभार सध्या वेगळ्या पद्धतीने चालत आहे. लोकशाहीला विरोधक पोषक आहे. मात्र हेच विरोधक कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशिष्ट पक्षाची मक्‍तेदारी वाढत आहे. देश हुकूमशाहीच्या वाटेवर चालला असून निरपेक्ष व वैचारिक गुणवत्ता स्‍पष्‍टपणे मांडणाऱ्या नागरिकांची गरज असल्‍याचे प्रतिपादन संविधान अभ्यासक अॅड. असीम सरोदे यांनी केले.
‘पात्र-अपात्रतेत अडकलेले लोकशाही मूल्य’ या विषयावर अलिबाग येथील काँग्रेस भवनमध्ये सोमवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी अॅड. जे.टी. पाटील, अॅड. श्रद्धा ठाकूर, सहयोग नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश मगर, मार्तंड नाखवा आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.
सरोदे म्हणाले, लोकशाही मार्गाने आम्ही निवडून आलो आहोत, असे सतत सांगितले जात आहे. त्यामुळे आमच्याबद्दल काही बोलायचे नाही, काही आक्षेप घ्यायचा नाही. या भूमिकेतून राजकारण सुरू आहे. विरोध करणारे कमी करायची भूमिका आहे. त्यामुळे भविष्यात निवडणुका होण्याबाबत शंका आहेत.
संसदेत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या भाषणाच्यावेळी माईक बंद केले जातात. त्यांना बोलू दिले जात नाही. लोकशाही व संविधान मानणारे नागरिक यावर नक्की आक्षेप घेतील. देशात सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र सध्या विरोधी पक्षाच्या अस्तित्वाबद्दल बोलताना काँग्रेसमुक्त भारत व लोकशाही विरोधी अशा हिंसक घोषणा केल्या जात असल्‍याचे विचार अॅड. असीम सरोदे यांनी स्‍पष्‍टपणे मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com