दुचाकी अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

दुचाकी अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

पाली, ता. २९ (वार्ताहर) : वाकण-पाली राज्य महामार्गावर वजरोली गावात जंगली पीर दर्ग्याजवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात नोंद करण्यत आली आहे.
ओमकार मोरेश्वर देशमुख (वय २०, रा. भालगुल, ता. सुधागड), ऋषिकेश निळकंठ लोखंडे (वय २४, रा. सर्वोदय लीला सोसायटी, कल्याण) व यश जयेश चव्हाण (वय २१, रा. बोईसर जि. पालघर) अशी अपघातील मृतांची नावे आहेत. ते तिघे जण त्यांच्याकडील दुचाकीवरून वेगाने प्रवास करीत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर घसरून कडेला असलेल्या लोखंडी संरक्षण कठड्याला जोरदार धडकली. यामध्ये दोघे जण रस्त्यावर व एक जण संरक्षण कठड्याच्या पलीकडे जोरात आदळला. हा अपघात इतका भीषण होता, की तिघांच्याही डोक्याला, हाताला तसेच पायाला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. यामध्ये ओमकार व ऋषिकेश यांचा जागीच मृत्यू झाला; तर यश चव्हाण याला उपचारांसाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com