सरळ सेवा भरतीविरोधात याचिका दाखल

सरळ सेवा भरतीविरोधात याचिका दाखल

विरार, ता. ४ (बातमीदार) : वसई-विरार शहर महानगरपालिकेमध्ये होऊ घातलेल्या सरळ सेवा भरतीविरोधात राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनतर्फे युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम भास्कर मुळीक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच ९७० जागांसाठी सरळ सेवेतून भरतीची प्रक्रिया होणार आहे.
सन २००९ मध्ये शहरातील ४ नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींचे विलीनीकरण होऊन वसई-विरार महानगरपालिकेची स्थापना झाली होती. तेव्हापासून पालिकेत सरळसेवेत भरती प्रक्रिया रखडली होती. सन २०१४ मध्ये पालिकेचा आकृतिबंध मंजूर झाला. त्यानुसार दोन हजार ८५३ पदे मंजूर होती. यापैकी २७ अधिकाऱ्यांची पदे प्रतिनियुक्तीवर भरण्यात आली होती; तर उर्वरित एक हजार पदे रिक्त होती. यातील ९७० पदांसाठी नोकरभरती कोकण विभागीय आयुक्तांकडून बिंदू नामावलीला मंजुरी मिळाल्याने करण्यात येणार आहे. यात पालघर जिल्ह्यात ७० टक्के जागा आरक्षित असणार आहेत; तर ३० टक्के जागा या खुल्या वर्गासाठी असणार आहेत. सरळ सेवा भरतीच्या वेळी ठेक्यावरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे वसई-विरार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. त्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे अजित पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com