पात्रांचा विकास होणे आवश्यक ः कर्णिक

पात्रांचा विकास होणे आवश्यक ः कर्णिक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : लेखकाने कादंबरी लिहून संपवल्यानंतर त्यातील पात्रांचा पुढील कादंबरीत विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. पात्रे विकसित होत राहणे प्रत्येक कादंबरीकारासमोरील आव्हान असते, असे मत ‘क्रोधे उत्पाटिला बळे’ या कादंबरीचे लेखक आणि समीक्षक डॉ. प्रदीप कर्णिक यांनी व्यक्त केले. मराठी संशोधन मंडळ, के. ग. जोशी कला आणि ना.गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), ठाणे मराठी भाषा विभाग आणि के. एम. अग्रवाल महाविद्यालय, कल्याण मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी कादंबरी - नव्या वाटा नवा प्रवास’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कादंबरीविषयक लेखनाचा प्रवास सांगताना ते बोलत होते.

याप्रसंगी डॉ. नितीन आरेकर, डॉ. प्रदीप कर्णिक, डॉ.नितीन रिंढे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. कर्णिक म्हणाले की, कादंबरी आशयाचे मर्यादित अवकाश व्यापत नाही. वाचकांना विचार करायला लावून कादंबरीतील पात्रांचा योग्य विकास करण्याचे आव्हान लेखकाने स्वीकारले पाहिजे. तर ती कलाकृती आणि तो कादंबरीकार खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असे म्हणता येईल. लेखिका नीरजा आणि डॉ. महेश केळूसकर यांनीही आपल्या कादंबरीचा प्रवास उलगडवून दाखवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com