आदीवासी समाजाचा हल्ला बोल

आदीवासी समाजाचा हल्ला बोल

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदीवासी समाजाचा हल्ला बोल

अलिबाग, ता. २१ (बातमीदार)ः जिल्ह्यात आदिवासी उत्थान कार्यक्रमांतर्गत आदिवासी समाजाचा सर्वांगिण विकास करण्याच्या घोषणा प्रशासनाकडून होत असताना दुसऱ्या बाजूला आदिवासी समाज मूलभुत सुविधांपासून वंचित आहेत. प्रशासनाविरोधात निषेध व्यक्‍त करण्यासाठी आदिवासी समाजाने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी हल्लाबोल करीत घोषणाबाजी केली. सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा पुकारण्यात आला असून त्यांनी उपोषणही सुरू केले आहे.
डोंगरदऱ्यामध्ये राहणारा आदिवासी समाजाला आजही पाण्यासाठी वणवण करावी लागते. वाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्त्या नाही. दळणवळणाची साधने नाहीत. बहुतांश सरकारी योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत नसल्‍याच्या तक्रारी यावेळी मांडण्यात आल्‍या.
आदिवासी समाजाला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाचा निषेध नोंदवून रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची चौकशी करावी, पेण तालुक्यातील तथाकथित आय.एस.ओ. ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी- खारपाडा हद्दीतील वडमालवाडीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवावी, मतदानापासून वंचित असलेल्या तांबडी, उंबरमाळ, केळीचीवाडी, काजूचीवाडी, खऊसावाडीची स्वतंत्र आदिवासी ग्रामपंचायत स्थापन करावी, त्यांना तात्काळ नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायत हद्दतील करंबेळी ठाकूरवाडी, खडई धनगरवाडा आणि पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आणि टोकाची वाडी या आदिवासीवाड्यांना रस्ता व पाण्यासारख्या मूलभूत सुविधा द्याव्यात या मागण्यांसाठी आदिवासींनी लढा सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com