मुख्यजलवाहिनीच्या कामाबाबत पालकमंत्र्यांना साकडे

मुख्यजलवाहिनीच्या कामाबाबत पालकमंत्र्यांना साकडे

जव्हार, ता. २३ (बातमीदार) : संस्थानकालीन जव्हार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणात नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग येथे पंपगृहात ४० एचपी मोटरपंपाऐवजी ६० एचपीचे पंप बसवण्यात आले आहेत; परंतु वाढत्या नागरीकरणामुळे ही यंत्रणा अपुरी पडत आहे. यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने भाजप जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत यांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जय सागर जलाशय येथे नवीन पंप व मुख्य जलवाहिनी यांचे काम होण्यासाठी साकडे घातले आहे. सन २००१ मध्ये जव्हार नगरपरिषदेची नळ जोडण्याची संख्या १,४५० इतकी होती; तर आज रोजी जव्हार नगरपरिषदेची वाढती लोकसंख्या पाहता नळजोडण्या २,५१० इतक्या झालेल्या आहेत. सद्यस्थितीत शहरास पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. तसेच शहरास विविध ठिकाणी कमी दाबाने व अपूर्ण स्वरूपात पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे जयसागर धरण येथील पंपगृहावर १०० एचपी क्षमतेचे दोन मोटर पंपसेट बसविणे हाच एक पर्याय आहे. तसेच धरणापासून ते जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत मुख्य जलवाहिनी ही जुनी झाली आहे. त्यामुळे त्याची लवकर दुरुस्ती करावी किंवा नवी जलवाहिनी टाकावी, अशी मागणी कुणाल उदावंत यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com