मुंबईच्या समुद्र किनारी पर्यटकांचे जीव धोक्यात

मुंबईच्या समुद्र किनारी पर्यटकांचे जीव धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईतील धोकादायक समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक नेमण्याबाबत मुंबई महापालिका, मुंबई मेरिटाईम बोर्ड आणि जिल्हाधिकारी शहर आणि उपनगरे यांच्यामध्ये टोलवाटोलवी केली जात असून ही प्राधिकरणे जबाबदारी एक दुसखऱ्यांवर ढकलत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात; मात्र किनाऱ्यांवर जीवरक्षकांची कमतरता आहे. किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढल्यास पर्यटकांवर नियंत्रण ठेवणे अवघड होते. परिणामी धोका टाळण्यासाठी किनाऱ्यांवर जीवरक्षकांची आवश्यकता आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार जीवरक्षकांची नेमणूक करण्याची जबाबदारी अग्निशमन दलाची आहे; मात्र मुंबई महापालिका, मुंबई मेरिटाईम बोर्ड आणि जिल्हाधिकारी शहर आणि उपनगरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही जीवरक्षकांचा तुटवडा दूर होत नसल्याची अग्निशमन दलाची खंत आहे.

तीन महिने धोक्याचे
गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, अक्सा, मार्वे, गोराई या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. ग्रामीण भागातून तसेच परराज्यांतून सुट्टीत मनोरंजनासाठी पर्यटक मुंबईतील समुद्रकिनाऱ्यला पसंती देतात. या वेळी समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने एप्रिल ते जून या महिन्यात पाण्यात बुडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या असलेल्या जीवरक्षकांची संख्या कमी आहे. ती वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.

प्रशिक्षणाचा अभाव
सध्या ११ कायमस्वरूपी आणि ‘दृष्टी’ या खासगी कंपनीचे १०५ जीवरक्षक पालिकेच्या अग्निशमन दलाने तैनात केले आहेत; मात्र समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी दिली आहेत. दरम्यान गेली १४ वर्षे या जीवरक्षकांना प्रशिक्षणच दिले नसल्याचे समजते. त्यात बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी साधन सामुग्रीचाहा अभाव आहे. दुर्बिण, जेट्स की, पेट्रोलिंगसाठी जीप, बॅगा ठेवणे, कपडे बदलणे, आंघोळ यासाठी सुविधांचा अभाव असल्याचे जीवरक्षकाचे सांगणे आहे.
-----
उन्हाळ्याच्या दिवसांत पर्यटक मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात येतात, त्या तुलनेत जादा जीवरक्षकांची आम्ही मागणी केली आहे. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- संजय मांजरेकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com