मुंबई विमानतळ दुरुस्तीसाठी सहा तास बंद

मुंबई विमानतळ दुरुस्तीसाठी सहा तास बंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : देशातील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक असलेच्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळवरील दोन्ही धावपट्टींची मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल आज करण्यात आली. याकरिता विमानतळावरील सर्व वाहतूक सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून दिवसाला सुमारे ८०० हून अधिक विमानांचे उड्डाण आणि आगमन होते. त्यामुळे धावपट्टीवर कमालीचा ताण असतो. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी धावपट्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम मंगळवारी करण्यात आले. यासाठी सर्व विमान वाहतूक सहा तास बंद ठेवण्यात आली होती. या वेळी धावपट्टी आणि टॅक्सी वेवरील जवळपास पाच हजार एरोनॉटिकल ग्राऊंड लाईट्स सर्व्हिस तपासण्यात आल्या. तसेच विमानांना दिशात्मक मार्गदर्शन करणाऱ्या १ हजार ३०० ग्राऊंड मार्किंग्ज नव्याने रंगवण्यात आल्या. शिवाय धावपट्टी परिसरात पावसाचे पाणी साचण्याची समस्या कमी करण्यासाठी दोन हजारहून अधिक नाले साफ करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com