आपत्तीग्रस्तांना ‘टाटा आमंत्र’मध्ये आसरा

आपत्तीग्रस्तांना ‘टाटा आमंत्र’मध्ये आसरा

उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) ः पावसाळ्यात पूरग्रस्त परिस्थिती ओढवली व इमारत कोसळून उल्हासनगरातील नागरिक बेघर झाल्यास त्यांना भिवंडीच्या ‘टाटा आमंत्रण’मधील इमारतींमध्ये आसरा मिळणार आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पालिका आयुक्त अजीज शेख यांनी आमंत्राची पाहणी करून आढावा घेतला आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी दिली.
शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदी तसेच अनेक छोट्या-मोठ्या नाल्यांना पावसाळ्यात पूर आल्यानंतर शहरातील सखल परिसर जलमय होतो. त्याचप्रमाणे धोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता लक्षात घेता या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सर्वप्रथम नागरिकांना तातडीने तात्पुरती पुनर्वसनाची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी पावसाळ्यापूर्वी आयुक्त अजीज शेख यांनी नागरिकांच्या पुनर्वसनाकरिता भिवंडी बायपास येथे असलेले टाटा आमंत्रण या ठिकाणी व्यवस्था केली आहे. अजीज शेख यांनी मुख्य सुरक्षारक्षक बाळू नेटके यांच्यासोबत टाटा आमंत्रण येथे पाहणी करून सबंधित अधिकऱ्यांना पुनर्वसनाबाबत सूचना दिल्या आहेत. महापालिकेने यंदा आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आपत्तीचा सामाना करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली असल्याचे जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com