महिलांची लवकरच भटकंती संपणार

महिलांची लवकरच भटकंती संपणार

डहाणू, ता. ७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सुविधांबरोबरच स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी कोट्यवधी रुपयांची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण होताच नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी आणि महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही, अशी ग्वाही पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित यांनी दिली.

बहाड जांबुपाडा येथे शेषवंशी क्षेत्रीय देवकर भंडारी समाजोन्नती संघामार्फत बांधण्यात येणाऱ्या समाज मंदिरासाठी राजेंद्र गावित यांच्या विकास निधीमधून दिलेल्या ३० लाख खर्चाच्या समाज मंदिराचे भूमिपूजन शनिवारी (ता. ६) पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. या समारंभाला जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा, जिल्हा दिशा विकास संस्थेचे विकास मडवे, सरपंच शैला पुंजारा, चिंचणीचे सरपंच नीतेश दुबळा, प्रकाश राऊत, वरोर उपसरपंच छाया पाटील, वाढवण उपसरपंच हरेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

एमएमआरडीएच्या मदतीने जिल्ह्यात अनेक पूल आणि रेल्वे, तसेच लहान-मोठ्या खाड्यांवरील पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पालघर येथे दोनशे खाटांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन योजनेकरिता, केंद्र सरकारने ११६५ कोटींची कामे मंजूर केल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेमार्फत कोट्यवधींची कामे मंजूर झाली आहेत. बहाड, वाढवण, वासगाव, चिंचणी, केळवे आणि ओसारवाडी या गावांत राहणाऱ्या देवकर भंडारी समाज मंदिरासाठी लागणारा उर्वरित निधी सामाजिक संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com