‘स्वच्छ नवी मुंबई’ला खीळ

‘स्वच्छ नवी मुंबई’ला खीळ

वाशी, ता. १० (बातमीदार)ः नवी मुंबई पालिकेने स्वच्छ भारत अभियान २०२३ मध्ये देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी शहरात पालिकेने कचराकुंडीमुक्त संकल्पना राबवली आहे; पण या निर्णयामुळे अनेक ठिकाणी कुंडी हटवली असली, तरी कचरा टाकला जात असल्याने स्वच्छ नवी मुंबईच्या संकल्पनेला खीळ बसली आहे.
नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रथम येण्यासाठी विविध संकल्पना राबवल्या आहेत. या अंतर्गत शहराला कचराकुंडीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कधीकाळी शहरामध्ये ११०० हून अधिक कचराकुंड्यांची संख्या आता ३५० वर आली आहे; पण पालिकेने ज्या ठिकाणी कचराकुंड्या हटवल्या आहेत. त्याच ठिकाणी सर्रासपणे कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. नवी मुंबईतील झोपडपट्टी भागासह, सिडको, गावठाणातील रहिवासी रस्त्यावरच कचरा आणून टाकत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरच कचऱ्याचे ढिग साचले असून स्वच्छ सर्वेक्षणाच्या प्रयत्नांनाच खीळ बसली आहे.
--------------------------------------
शहरात कचराकुंडीमुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार कचराकुंड्या हटवण्यात आलेल्या आहे. शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनीदेखील स्वतःहून सामाजिक भान जपत पालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत गाडीत कचरा टाकणे अपेक्षित आहे.
- बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com