कर्जत पाणी

कर्जत पाणी

महिनाभर २५ गावांना टँकरने पाणीपुरवठा
कर्जतमध्ये सुधाकर घारे प्रतिष्‍ठानचा उपक्रम

नेरळ, ता. १५ (बातमीदार) ः उन्हाच्या झळांसोबत पाणी टंचाईच्या झळा दुर्गम भागात तीव्र झाल्‍या आहेत. यंदा कर्जत तालुक्यातील २५ गावांना आणि त्या गावांतर्गत येणाऱ्या वाड्यावस्त्यांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या टंचाईग्रस्त गावांना सुधाकर घारे प्रतिष्ठानने आधार दिला असून रविवारपासून (ता.१४) गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मोहीम सुरू केली आहे. याची सुरुवात खांडस ग्रामपंचायतीतील बांगरवाडी गावातून झाली.
मोहिमेअंतर्गत सात लाख ८० हजार लिटर पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून दरदिवशी २६ हजार लिटर पाणीपुरवठा केला जाणार आहे. तालुक्‍यातील खांडस, अभेरपाडा, पाथरज, नांदगाव, आळेमण,कळंब या मोठ्या ग्रामपंचायती मधील बांगरवाडी, धनीवाडी, पेठारवाडी, वडाचीवाडी, टेपावाडी, मेंगाळवाडी, पादिरवाडी, चाफेवाडी, काठेवाडी, बेलाचीवाडी, आंबेरपाडा, ताडवाडी, मोरेवाडी, धोत्रेवाडी, मोहपाडा, चिंबरेवाडी, दिवाळीवाडी, विठ्ठलवाडी, झुगरेवाडी, ओलमनगाव, बनाचीवाडी, बोरीचीवाडी, चाहुचीवाडी, गुडवनवाडी, नवसुचीवाडी या २५ गावांना महिनाभर पाणी पुरवठा होणार आहे. टँकरने पाणी पुरवठा मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे, उपाध्यक्ष अशोक भोपतराव, ज्येष्ठ नेते एकनाथ धुळे, कर्जत महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे, खांडसचे सरपंच मंगल ऐनकर, मालू निरगुडा आदी उपस्थित होते.

कर्जत-खोपोली मतदारसंघात दुर्गम, डोंगराळ भाग जास्‍त आहे. येथील महिलांना पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागते. त्‍यामुळे टँकरने महिनाभर पाणी उपलब्‍ध करून देणार असून येत्या काळात परिसरातील पाणी टंचाई निवारणासाठी काय उपाययोजना करण्यात येऊ शकतील, याबाबत सरकारकडे पाठपुरवठा करणार आहे.
- सुधाकर घारे, माजी उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद

---------------

विंधन विहिरीमुळे आदिवासी वाडीला दिलासा
नेरळ (बातमीदार) ः कर्जत तालुक्‍यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून १८ गाव ६० वाड्यांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी चिमटेवाडी व मोहपाडा आदिवासी वाडीत तत्‍काळ विंधन विहिरीचे काम करून घेतल्‍याने ग्रामस्‍थांना दिलासा मिळाला आहे. तालुक्‍यातील बहुतांश नैसर्गिक जलस्रोत आटले असून धरणांचीही पातळी खालावली आहे. त्‍यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र झाल्‍या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com