भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानमधून सुटका

भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानमधून सुटका

कासा, ता. १६ (बातमीदार) : पाकिस्तानमध्ये अडकलेल्या मच्छीमारांची सुटका होत आहे ही आनंदाची बाब आहे. त्यांचे स्वागत असून उर्वरित मच्छीमारांची सुटका करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.
आदिवासी बांधवांना रोजगार मिळत नाही, म्हणून ते गुजरातच्या मच्छीमार समाजासोबत खलाशी म्हणून काम करत असतात; पण अनवधानाने मासेमारी करताना पाकिस्तानच्या हद्दीत असल्याचा ठपका ठेऊन त्या मच्छीमारांना ताब्यात घेऊन त्यांना डांबून ठेवण्यात येते. हे अतिशय निंदनीय असल्याचे आमदार निकोले म्हणाले. आपल्या देशातील ६६६ मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यापैकी ६०० मच्छीमारना सोडण्याची अधिकृत घोषणा १३ मे २०२३ रोजी पाकिस्तान सरकारने केली आहे. नुकत्याच मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत मंत्रालयाकडून जारी केलेल्या पत्रानुसार पहिला २०० मच्छीमारांचा गट ११ मे रोजी वाघा बॉर्डरवर पाठवण्यात आला आहे. दुसरा २०० मच्छीमारांचा गट २ जून रोजी; तर तिसरा १०० मच्छीमारांचा गट ३ जुलै २०२३ रोजी पाठवण्यात येईल, असे त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

------------------
३० मच्छीमार पालघरमधील
सुटका होणाऱ्या मच्छीमारांमध्ये ३० मच्छीमार हे पालघर जिल्ह्यातील आहेत. त्यातील पाच मच्छीमारांना पहिल्या गटात सोडण्यात आले आहे. यात पालघर जिल्ह्यासहित डहाणू व तलासरी येथील विविध पाड्यांतील आदिवासी बांधवांचादेखील समावेश आहे, अशी माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली आहे. तसेच त्यांच्या सुटकेचे स्वागत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com