नेरुळ-उरण रेल्वेला शुक्लकाष्ठ

नेरुळ-उरण रेल्वेला शुक्लकाष्ठ

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.२३ः नेरुळ-उरण मार्गावर रेल्वे लवकरच धावणार आहे. या मार्गावर असलेल्या स्थानकांना रेल्वे प्रशासनाकडून वेगळ्या गावांची नावे देण्यात आली आहेत. मात्र, त्याऐवजी महसूली नोंदी असणाऱ्या आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या गावांची नावे द्यावी, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे.
मुंबईला थेट उरण शहराशी जोडणाऱ्या, बहुप्रतीक्षित नेरूळ-उरण रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सध्या नेरूळ ते खारकोपर या टप्प्यात धावणारी नेरूळ-उरण रेल्वे काही दिवसांतच थेट उरणला पोहोचणार आहे. हा नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर, सीएसटीहून रेल्वेने थेट उरणला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या महिनाभरात नेरूळ-उरण रेल्वे सुरू होण्याचे संकेत रेल्वेकडून मिळाले आहेत. मात्र, या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे आहेत त्यांना गावांची ओळख मिळाली पाहिजे, त्यामुळे महसूल अधिकार क्षेत्रात उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला त्याच गावाचे देणे उचित ठरणार असल्याने त्या ठिकाणी इतर नाव दिल्यास अन्यायकारी होणार आहे. त्यामुळे लोकभावनेचा विचार करून द्रोणागिरी असा उल्लेख न करता बोकडवीरा द्रोणागिरी, न्हावा शेवाऐवजी नवघर, रांजणपाडा ऐवजी धुतूम करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, बोकडवीरा ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष व सरपंच मनोज पाटील, नवघर ग्रामपंचायतीचे माजी उप सरपंच रवी वाजेकर, धुतूम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरद ठाकूर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com