प्राधिकरणातील २१ गावांचा कचराप्रश्न मार्गी लावा

प्राधिकरणातील २१ गावांचा कचराप्रश्न मार्गी लावा

विरार, ता. २७ (बातमीदार) : नायगाव पूर्वेतील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, परंतु वाढत्या लोकसंख्येनुसार गावांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांवर ताण पडत आहे. महाराष्ट्र सरकारने वसई-विरार महापालिकेसाठी राजपत्राद्वारे २१ गावांकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केला आहे. या गावांमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिकेने २१ गावांचा कचराप्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावण्याची मागणी माजी सभापती कन्हैया भोईर यांनी महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

महापालिकेच्या विशेष नियोजन प्राधिकरणामध्ये २१ गावांचा समावेश आहे; मात्र या गावांमधील दैनंदिन कचऱ्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. वेळीच कचरा उचलला जात नसल्यामुळे तो अनेक दिवस तसाच पडून राहत आहे. उघड्यावरील कचऱ्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे रोगराई पसरून जनसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. २१ गावांचा कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने कचरा साफसफाईची स्वतंत्र निविदा काढावी; अथवा जुन्या कंत्राटदारांच्या मनुष्यबळामध्ये अतिरिक्त वाढ करून ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी कन्हैया भोईर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com