भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

विविध अपघातांत राज्यभरात नऊ ठार
तलासरीजवळील दुर्घटनेत तिघांचा मृत्यू
मुंबई, ता. २५ ः राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरीजवळ भरधाव कार आणि मोटारसायकलच्या धडकेत तिघांना जीव गमवावा लागला. दुसऱ्या घटनेत मेंढ्या घेऊन हैदराबादकडे जाणारा भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला धडकून हिंगोलीत झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. दीडशे मेंढ्याही दगावल्या. जिंतूर-जालना मार्गावर रानडुकराला धडकल्याने एक दुचाकीस्वार मरण पावला. महाराष्ट्र-तेलंगणा राज्यसीमा परिसरात झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरीजवळ गुरुवारी (ता. २५) कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याने तिघांना जीव गमवावा लागला. सुनील वाडकर, किशोर कांबडी आणि विक्रम कांबडी अशी मृतांची नावे आहेत. तिघेही नाशिक सरसूल बारीमाळ परिसरात राहणारे आदिवासी तरुण होते. या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. संजानमधील कंपनीत कामाला जात असतानाच तिघांना मृत्यूने गाठले. सुनील वाडकर आणि किशोर कांबडी यांचा जागीच मृत्यू झाला. विक्रम कांबडी याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तलासरी पोलिसांनी कारचालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
चारठाणा (ता. जिंतूर) : रानडुकराला धडकून दुचाकीस्वार मरण पावल्याची घटना जिंतूर-जालना मार्गावरील हलविरा पाटी येथे बुधवारी (ता.२४) घडली. भास्कर रथकर (वय ४३) असे मृताचे नाव आहे. यात एक जण जखमी झाला आहे.
जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील रहिवासी भास्कर आणि भारत रथकर हे दोघे दुचाकीवरून चारठाण्याकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीसमोर अचानक रानडुक्कर आले. दुचाकीचा वेग जास्त असल्याने दुचाकी रानडुकराला जाऊन धडकली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून कोसळले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे प्रथमोपचार करून त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास भास्कर यांचा मृत्यू झाला. भारत यांची प्रकृती गंभीर आहे.

ट्रक अपघातात चौघे दगावले
कळमनुरी (हिंगोली) ः मेंढ्या घेऊन हैदराबादच्या दिशेने निघालेल्या ट्रकला झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात दीडशे मेंढ्या दगावल्या असून काही जखमी झाल्या आहेत. अलिम ताहेरखा (वय ४५), सत्यनारायण बलवाई (४५), आलम यादगार (४८) आणि हेमराज मीना (३५) अशी मृतांची नावे आहेत.

संबंधित वृत्त पान --

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com