उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग बंद करा : आमदार प्रताप सरनाईक

उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग बंद करा : आमदार प्रताप सरनाईक

ठाणे, ता. २७ : एका बाजूला नवी मुंबई महानगरपालिकेसह ‘ड’ वर्ग महापालिका असलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेची उद्याने मात्र सुस्थितीत आहेत, पण ठाणे महानगरपालिकेतील उद्याने व वृक्ष प्राधिकरणातील अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे उद्यानांची दुरवस्था झाल्याचा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. तसेच त्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना इतर खात्यांमध्ये बदली करून हा विभाग कायमचा बंद करावा व मिरा-भाईंदर महापालिकेप्रमाणे वार्षिक ठेकेदारामार्फत या उद्याने व मैदानांची दुरुस्ती व देखभाल करावी, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. कळवा येथील स्व. उत्तमराव पाटील निसर्ग संरक्षण व जैवविविधता उद्यान तसेच घोडबंदर रोडवरील ‘जुने ठाणे नवीन ठाणे’ उद्यान, तसेच रुणवाल प्लाझाशेजारील बॉलीवूडच्या थीमपार्कच्या दुरवस्थेकरितासुद्धा हेच उद्यान विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. अशी टीकाही आमदार सरनाईक यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com