ठाण्यात जल जीवन जनजागृती प्रचार रथ

ठाण्यात जल जीवन जनजागृती प्रचार रथ

ठाणे, ता. २८ : वसुंधरा संजीवनी मंडळ व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यात जलयुक्त शिवारांतर्गत होणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि जलजीवन मिशन योजनेच्या जनजागृतीसाठी प्रचाररथाला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. या वेळी विभागीय वनाधिकारी कांचन पवार, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार राजाराम तवटे, ठाणे जिल्हा परिषदचे जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार, वसुंधरा संजीवनी मंडळ संस्थापक आनंद भागवत आदी उपस्थित होते. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर भिवंडी या तालुक्यातील ७२ तलावांतील गाळ काढण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यासाठी प्रत्येक गावाने पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी या सर्व जलसाठ्यांमधून गाळ काढणे त्यांची कायमस्वरूपी निगा राखणे, पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ‘जलयुक्त शिवार’ तसेच ‘जलजीवन मिशन’ या योजनांच्या माध्यमातून वरील सर्व कामे सहज रीतीने करता येऊ शकतात. यासाठी ग्रामपंचायतींना व पाणी समित्यांना योग्य ते प्रशिक्षण दिल्यास, आपल्या परिसरातील सर्व तलावांचा गाळ प्रशासनाच्या माध्यमाने काढला जाऊ शकतो. ज्या ग्रामपंचायती आपले गाव जल-आत्मनिर्भर करण्यासाठीची ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतील, अशा ग्रामपंचायतीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com