स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नसल्याने गैरसोय

स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नसल्याने गैरसोय

ठाणे, ता. २८ (बातमीदार) : दिवा शहरातील स्मशानभूमीत पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन येथील स्मशानभूमीत पालिकेने पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपचे दिवा अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे. जर येथे पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही, तर आंदोलन करू, असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.
दिवावासीयांना नेहमी पाण्यासाठी वनवास भोगावा लागत आहे. पाणीटंचाई असल्यामुळे नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असतानाच आता, दिव्यातील स्मशानभूमीतही पाण्याची व्यवस्था नसल्याची बाब समोर आली आहे. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पाण्याची आवश्यकता असते; परंतु स्मशानभूमीत पाणी उपलब्ध नसल्यामुळे लोकांना वणवण फिरावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
दिवा शहरातील आगासन, बेतवडे, म्हातार्डी, दातिवली, दिवा साबे या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या पूर्वीच्या स्मशानभूमी आहेत. ३५ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाल ठाणे महापालिकेत ही गावे आहेत; परंतु तरीही महापालिकेच्या या स्मशानभूमीत पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. स्मशानात येताना येथील नागरिकांना हातामध्ये पाण्याचे कॅन सोबत आणावे लागत आहेत. या भागाकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपचे दिवा अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे. दिव्यामधील या सर्व स्मशानभूमीला तातडीने पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी; अन्यथा भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुंडे यांनी दिला आहे. यासंदर्भात, ठाणे महानगरपालिका आयुक्तांशी ते चर्चा करणार असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com