जव्हारमधील पीएम किसान योजनेच्या इ-केवायसीचे काम पूर्ण

जव्हारमधील पीएम किसान योजनेच्या इ-केवायसीचे काम पूर्ण

Published on

जव्हार, ता. ६ (बातमीदार) ः जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांचे ई-केवायसी ९८ टक्‍के पूर्ण झाले आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागात राहत असलेल्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करताना इंटरनेट नेटवर्कमुळे अडचणीला सामोरे जावे लागत होते, परंतु कृषी विभागाच्या शिबिरामुळे जनजागृती होऊन गावपाड्यांमध्ये पीएम किसान निधी सन्मान योजनेचे केवायसी करणे, मोबाईल लिंक करणे, सातबारा अपलोड करणे अशी सुविधा उपलब्ध झाल्याने तालुक्यातील ९८ टक्के कामे पूर्ण झाले आहे. तालुक्यात ११,७५४ लाभार्थ्यांपैकी १०,८०९ लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे. केवळ दोन टक्के लाभार्थ्यांची म्हणजे ९४५ लाभार्थ्यांचे ई-केवायसी करणे राहिले आहे. त्यात मृत, बाहेरगावी गेलेले आणि अंथरुणावर खिळलेले लाभार्थी यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी याअनुषंगाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. दर चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली जाते. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत १३ हप्ते लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. या योजनेचा पुढील हप्ता जुलै महिन्यात देण्यात येणार आहे; मात्र त्यापूर्वी लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांनी सेतू केंद्र, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून जुलैपर्यंत ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक सोमवंशी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.