Alibagh umte dam
Alibagh umte damsakal

Alibagh :नागरिकांनो आणि जपून वापर; उमटे धरणातून दिवसाआड पाणीपुरवठा

उन्हाळ्यात तालुक्यातील बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावते. त्‍यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने आतापासूनच कपात सुरू केली आहे. ४० हजारांहून अधिक नागरिकांना पुरवठा करणाऱ्या उमटे धरणातून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


४५वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या उमटे धरणाची उंची ५६.४० मीटर, तर साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत उमटे धरणाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाते. तालुक्यातील सुडकोली, रामराज, चिंचोटी, बेलोशी, बोरघर, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, बामणगाव, या १२ ग्रामपंचायतीमधील जवळपास ४८ गावे-वाड्यांमधील साधारण ४० हजारांहून अधिक नागरिकांची तहान धरणाद्वारे भागवली जाते.
धरणामध्ये गाळ साचल्याने नागरिकांना एप्रिलपासूनच टंचाईला सामोरे जावे लागते. मातीमिश्रित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचा धोका अधिक आहे.

Alibagh umte dam
Mumbai Pune Express Way: नागरिकांनो लक्ष द्या; मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेवर आज दोन तासांचा ब्लॉक!

त्यामुळे अनेकांना पाणी विकत घेउन तहान भागवावी लागते. त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो. उमटे धरणामध्ये सध्या ५१ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये, नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, यासाठी एक जानेवारीपासून पाणी कपातीला सुरुवात केली आहे. नागरिकांना एक दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे

तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यास जिल्हा परिषद उदासीन ठरले आहे. अनेक वर्षांपासून धरणात गाळ साचला आहे. त्‍यामुळे एप्रिल, मेअखेर गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. जलसंधारण विभागाच्या मदतीने धरणातील गाळ काढण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने केला होता. जलसंधारण विभागाच्या यंत्र सामुग्रीसाठी लागणाऱ्या इंधनचा खर्च जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आला. त्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र तेही काम अपूर्ण राहिल्‍याने खर्च पाण्यात गेल्‍याचे बोलले जात आहे.

Alibagh umte dam
Mumbai: नवोदित कलाकारांना संधी देण्यासाठी महापालिका आली पुढे; घेतला महत्वाचा निर्णय

नागरिकांना जूनपर्यंत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी एक जानेवारीपासून पाणी कपातीला सुरुवात केली आहे. याबाबत तालुक्यातील ग्रामपंचायतींनादेखील कळवण्यात आले आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.
- निहाल चवरकर, उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, अलिबाग

धरणातील गाळ काढण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधी व साहित्य नसल्याने जलसंधारण विभागाची मदत घेतली जाणार आहे. गतवर्षी त्यांना पत्र दिले आहे, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही हालचाल झालेल्‍या नाही. दोन वर्षापूर्वी जलसंधारण विभागाच्या मदतीने गाळ काढण्यात आला होता. परंतु मध्येच पाऊस पडल्याने काम थांबले.
- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद

Alibagh umte dam
Mumbai: नवोदित कलाकारांना संधी देण्यासाठी महापालिका आली पुढे; घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com