Mumbai News: विजेच्या धक्क्याने नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू; चार जणांविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा
Mumbai News: इमारतीच्या बागेमधील उघड्यावर असलेल्या विद्युत वाहिनीतून विजेचा धक्का लागून एका नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगावात घडली. आर्यवीर अजय चौधरी असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी सोसायटीच्या चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत मुलाच्या वडिलांनी यांसंदर्भात पोलिस तक्रार केली. आर्यवीर हा शुक्रवारी (ता. १२) त्याच्या मित्रासोबत सोसायटीच्या बागेत खेळत होता. येथील उघड्यावर असलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता. यामध्ये सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी लोखंडी पाईपवर फुटलेला पांढऱ्या रंगाचा विजेचा दिवा लावला होता. यातील वायर उघड्यावर निष्काळजीपणाने ठेवण्यात आली होती. या वायरमधूनच आर्यवीरला विजेचा धक्का लागला. (Mumbai News Nine-year-old boy dies of electric shock; Charge of negligence against four persons)
याप्रकरणी पोलिसांनी सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि केअरटेकर अशा चौघांविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.