पंचायत समितीच्‍या निवडणुकांचे वेध

पंचायत समितीच्‍या निवडणुकांचे वेध

पंचायत समितीच्‍या निवडणुकांचे वेध
ाालोकसभा, विधानसभेनंतर पडघम वाजण्याचे संकेत
कामोठे, ता. २८ (बातमीदार) : पंचायत समितीची निवडणूक लांबणीवर गेल्याने पनवेल तालुक्यातील विकासकामांना ब्रेक लागला आहे. आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्‍यामुळे प्रशासकराज संपून लोकप्रतिनिधींकडे कधी कारभार जातो, याचे स्‍थानिक राजकीय नेत्‍यांना वेध लागले आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, उरण, पेण, खालापूर, कर्जत, रोहा, सुधागड, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या १५ पंचायत समित्यांची मुदत १३ मार्च २०२२ मध्ये संपली आहे. पनवेल पंचायत समिती ही रायगड जिल्ह्यात अग्रगण्य आहे. पनवेल पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत संपल्याने १४ मार्च २०२२ मध्ये पंचायत समितीचा कारभार प्रशासनाकडे गेला आहे. गटविकास अधिकारी संजय भोय हे प्रशासक म्हणून पंचायत समितीचा कारभार सांभाळत आहेत. पनवेल पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेचे एकूण ८ गट, १६ गण आहेत. ७१ ग्रामपंचायती व १४६ गावांचा यामध्ये समावेश आहे. पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून तालुक्यातील गावांच्या विकासावर भर दिला जातो. सरकारी योजनांच्या माध्यमातून विकास कामे केली जातात. शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग आदी लोकांचे विविध प्रश्न, मागणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. अधिकारी व कर्मचारी वर्गावर अंकुश ठेवला जातो. प्रशासकीय राजवट आल्यामुळे पंचायत समितीमधील माजी लोकप्रतिनिधींचे वर्चस्व कमी झाले आहे. जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकाच्या दालनाचे खेटे मारावे लागत आहेत. आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
..............................
प्रशासक राजवटीमुळे लाभार्थी योजनांपासून दूर जात आहे. केळवणे गणातील समस्या वाढत आहेत. पंचायत समिती सदस्य असताना पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत होती. कर्मचाऱ्यांवर अंकुश होता, प्रशासक राजवटीत कर्मचाऱ्यांवर कसलाही अंकुश उरला नसल्याने जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत.
- मनीषा मोरे, माजी सदस्या, पनवेल पंचायत समिती.
..................
प्रशासक कार्यकाळात ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकार, प्रशासकीय स्तरावर निवडणुकीचे कार्यक्रम राबवले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसल्याने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- संजय भोय, प्रशासक तथा गटविकास अधिकारी, पनवेल पंचायत समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com