Mumbai Traffic: विक्रोळी उड्डाणपुलामुळे चालकांचे हाल! वाहतूक कोंडीचे नवे संकट; वेळ आणि इंधनाचा अपव्यय

Vikhroli flyover Traffic jam: पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या पुलामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे.
Vikhroli flyover Traffic jam
Vikhroli flyover Traffic jamESakal
Updated on

मुंबई : पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ नव्याने बांधलेला उड्डाणपुल नागरिकांसाठी खुला होऊन दीड महिना उलटून गेला आहे. या उड्डाणपुलामुळे स्थानिकांना दिलासा मिळण्याऐवजी पुलाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागात सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या पुलामुळे वेळ आणि इंधन वाचण्याऐवजी अपव्यय होत आहे. वाहन चालकांची डोकेदुखी वाढली असून पुलाच्या तीन लेन केल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ उडत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com