20 नद्यांना मिळणार नवसंजीवनी - रामदास कदम

20 नद्यांना मिळणार नवसंजीवनी - रामदास कदम

मुंबई - मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर राज्यातील 20 प्रदूषित नद्यांना संजीवनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 20 नद्या पुनर्जीवित करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.  काल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कुलाबा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कदम यांनी ही माहिती दिली.

राज्यातील मुंबई, ठाणे आणि पुण्यातील नद्या सर्वांत प्रदूषित आहेत. मुंबईतील मिठीसह पुण्यातील भीमा, मुळा-मुठा, पवना; तर ठाण्यातील उल्हास, वालधून यासह आठ नद्या प्रदूषित आहेत. याप्रकारे राज्यातील 20 नद्या पुनर्जीवित करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले. यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. 

मुंबईतील मिठी नदीसाठी आणखी 990 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहेत; तर नागपूरच्या नाग नदीसाठी 990 कोटी रुपये खर्च करण्याचा आराखडा आहे. त्याचबरोबर नाशिक येथील पंचगंगा नदीसाठी 90 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली असल्याचे कदम यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com