
Mumbai High Court Acts Against Corruption Two Judges Fired
Esakal
लाच घेतल्याच्या आणि जप्त केलेल्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याच्या आरोपांनंतर दोन सत्र न्यायाधीशांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलीय. सातारा आणि पालघर जिल्ह्यातील हे दोन सत्र न्यायाधीश आहेत. त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने दोन्ही न्यायाधीशांनी १ ऑक्टोबरपासून पदमुक्त होण्यास सांगितलं. सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख असी बडतर्फ करण्यात आलेल्या न्यायाधीशांची नावे आहेत.