
Uday Samant: राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीहून महाडच्या दौऱ्याला जात होते. यावेळी त्यांच्या कारच्या समोरच एका एसटीला अपघात झाला. या अपघात झालेल्या एस.टी.मध्ये तब्येत 21 प्रवासी अडकले होते.
अशावेळी दुसरा कोणताही विचार न करता मंत्री उदय सामंत यांनी या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसह एसटी बस मध्ये अडकलेल्या 21 जणांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी त्यांनी केलेल्या या कार्याची नोंद सर्वत्र घेतली जात आहे व त्यांचे कौतुक होत आहे.
रत्नागिरी-महाड-वसई बस वसईच्या दिशेने जात असताना हातखंबा येथे तिचा अपघात झाला. योगायोग म्हणजे त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे स्वतः कारमधून महाड दौऱ्यावर जात होते. मात्र त्यांनी हा अपघात पहाताच त्यांनी कार मधुन उतरून मदतकार्य केले.
मंत्री उदय सावंत यांनी जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ आपल्या एस्कॉर्ट करणाऱ्या कारमधून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. यावेळी नागरिक किरकोळ जखमी झाले. मात्र मंत्री महोदयांनी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले व मंत्री महोदयांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.