मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष शेवटून पहिला आल्याने उद्धव ठाकरे यांनी आपले राजकीय मूल्य तपासून घ्यावे, अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. मराठा आरक्षणाच्या तव्यावर आपली पोळी भाजून घेता येते का ? हे पाहण्याचा अनेकजण केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
बिहारच्या नितीश कुमार यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची महाराष्ट्राला आवश्यकता नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व सक्षम आहे. सर्व समाजाला बरोबर घेत सर्वांना आरक्षण द्यायची न्याय्य भुमिका महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाची आहे. कायद्यात टिकेल अशा प्रकारचे आरक्षण या सरकारला द्यायचे आहे. नितीशकुमार यांच्या नैतिकतेचा ऱ्हास झाला असून त्यांची री ओढतांना अशोक चव्हाण दिसत असल्याचा टोमणाही दरेकरांनी लगावला.
सरकार पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात अतिशय गांभीर्याने काम करत आहे. कधीच सरकार एवढ्या ऍक्शन मोडमध्ये आले नव्हते. शिंदे समिती नोंदणी तपासत आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यलयात नोंदणी तपासण्याची लगबग आहे. जेवढे जास्तीत जास्त कर्मचारी उपलब्ध करून देता येतील तेवढे सरकारने दिले आहे.
अजून कर्मचाऱ्यांची गरज असेल तर ते ही दिले जातील, असेही त्यांनी दाखवून दिले. आरक्षणाच्या दृष्टीने सरकार सकारात्मक आहे हाच उबाठा पक्षाला प्रॉब्लेम आहे. ह्यांची राजकीय दुकानदारी करायला वाव नाही हीच खरी पोटदुखी आहे, अशी जळजळीत टीकाही दरेकर यांनी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.