

Water Supply from tanker
ESakal
नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर : कोट्यवधी रुपयांच्या जलवाहिन्या, वाढीव पाणीपुरवठा योजना आणि नुकतीच करण्यात आलेली पाणी दरवाढ; तरीही उल्हासनगरकरांच्या नळांना कोरडेपणाचाच शाप कायम असल्याचे चित्र आहे. शहराला सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या महापालिकेलाच आता नागरिकांची तहान भागवण्यासाठी पुन्हा टँकरचा आधार घ्यावा लागत असल्याने सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.