

Waldhuni River Ghat Construction
ESakal
उल्हासनगर : उल्हासनगर-अंबरनाथ सीमेवरील प्राचीन शिवमंदिर परिसर आणि वालधुनी नदी सुशोभीकरण प्रकल्पामुळे एकतानगर व कैलास कॉलनीत तणाव निर्माण झाला आहे. घाट उभारणीस अडथळा ठरत असल्याचा दावा करत उल्हासनगर महापालिकेने येथील ३० घरांना अवघ्या दोन दिवसांत जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. सुमारे चार दशकांपासून येथे राहणाऱ्या कुटुंबांवर अचानक बेघर होण्याची वेळ आल्याने परिसरात भीती व संतापाचे वातावरण आहे. पुनर्वसनाशिवाय घरे तोडू नयेत, या मागणीवर रहिवासी ठाम आहेत.