

water price hike
esakal
उल्हासनगर : निवडणुकीच्या काळात पाणी दरवाढ रद्द केल्याचा गाजावाजा करून दिलेले आश्वासन आता हवेत विरण्याची चिन्हे आहेत. निवडणुका पार पडल्यानंतर आयोजित पहिल्याच विशेष महासभेत पाणी दरवाढीचा प्रस्ताव अजेंड्यावर आल्याने उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी (२० फेब्रुवारी) होणारी ही महासभा आता केवळ प्रशासकीय विषय न राहता राजकीय ‘विश्वासार्हतेची’ परीक्षा ठरणार आहे.