

Ulhasnagar Wireman dies of electric shock
ESakal
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे मोठी दुर्घटना घडली आहे. महावितरणचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सहकाऱ्यांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून पीडित कुटुंबाला ५० लाखांच्या मदतीची मागणी समाजातून केली जात आहे.