Vasai Virar Flood Relief: वसई-विरार पूरमुक्तीसाठी महापौरांचा 'खाडी' मिशन! ठाणे महापालिका आयुक्तांकडून पत्राची दखल

वसई-विरारला दरवर्षीच्या पुरसंकटातून मुक्त करण्यासाठी कळवा खाडीतील गाळ उपसा, खोली वाढवणे व अतिक्रमणांवर कारवाई यांसह दीर्घकालीन तांत्रिक उपाययोजनांना गती; ठाणे महापालिका व विभागीय आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद
Strategic Push for Flood-Free Vasai-Virar: Mayor’s Administrative Follow-up Shows Results

Strategic Push for Flood-Free Vasai-Virar: Mayor’s Administrative Follow-up Shows Results

sakal
Updated on

विरार : सई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या भीषण पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौर अजीव पद्मावती यशवंत पाटील यांनी सुरू केलेल्या मोहिमेला यश येताना दिसत आहे. या गंभीर समस्येबाबत महापौरांनी १० एप्रिल २०२६ रोजी ठाणे महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्राची प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली असून, त्यावर तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे उपआयुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी २० एप्रिल २०२६ रोजी महापौरांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कळवा खाडीचे पात्र अरुंद झाल्यामुळे वसई-नायगाव परिसरात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत आणि त्यावरील तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतच्या मागणीचे ठाणे महापालिका आयुक्तांनी स्वतः अवलोकन केले आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखून पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी हे प्रकरण आता तातडीने अतिरिक्त आयुक्त-२ यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com