Vietnam Boat Accident : व्हिएतनाम बोट दुर्घटनेतील १५ भारतीयांचे पार्थिव मुंबईहून ३ राज्यांत रवाना, आज अंत्यसंस्कार

Indian Tourists Death : विशेष विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे रात्री ९:२० वाजता उतरले. मृतांमध्ये १० जण तामिळनाडू, ३ जण आंध्र प्रदेश आणि २ जण केरळमधील होते.
Repatriation of Indian Victims from Vietnam Tragedy

Repatriation of Indian Victims from Vietnam Tragedy

esakal

Updated on

व्हिएतनाममधील 'फू क्वोक'बेटाजवळ झालेल्या एका दुर्दैवी बोट अपघातात प्राण गमावलेल्या १५ भारतीय नागरिकांचे मृतदेह सोमवारी भारतात आणण्यात आले. हे पार्थिव घेऊन आलेले विशेष विमान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९:२० च्या सुमारास मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. ते आज तीनही राज्यात रवाना झाले आहे. पार्थिवांवर आजच अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com