मतदार यादी प्रभाग रचनेनुसार करावी; निवडणूक आयोगाकडे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची मागणी

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मुख्यालयात सोमवारी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी एक आढावा बैठक घेतली.
Kapil patil
Kapil patilSakal
Summary

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मुख्यालयात सोमवारी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी एक आढावा बैठक घेतली.

डोंबिवली - विधानसभा निवडणुकीच्या याद्या लोकसभा आणि महापालिका निवडणुकीला वापरल्या जातात. शहरातील मतदारांचे सतत ठिकाण बदलत असल्याने त्यांची नावे वेगळ्या यादीत जातात. त्यामुळे या याद्या बदलून नव्याने याद्या बनविल्या गेल्या पाहिजे. महापालिकेच्या याद्या प्रभागानुसार अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यासाठी निर्देश दिले पाहिजेत. सेक्शन वाइज् मतदार याद्या न करता प्रभागा नुसार याद्या निर्माण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केडीएमसी आणि प्रांताला दिल्या तर हा प्रश्न सुटेल असे मत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथे व्यक्त केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मुख्यालयात सोमवारी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी एक आढावा बैठक घेतली. या बैठकीला पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मतदार यादीतील नावांत घोळ असल्याच्या तक्रारी केंद्रीय मंत्री पाटील यांच्याकडे गेल्या होत्या. त्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री सोमवारी पालिकेत आले होते.

याविषयी ते म्हणाले, पालिकेला निर्देश दिले गेले आहेत की, सेक्शन वाईज मतदार याद्या तयार करा. या याद्या तयार झाल्यानंतर प्रभाग रचनेच्या बाहेर काही नावे गेल्याने ती नावे दुसऱ्या प्रभागत आणि दुसऱ्या प्रभागाची तिसऱ्या प्रभागात गेली. त्याच्यामुळे मतदार यादी मध्ये नाव असूनही मतदाराला मतदान करता येणार नाही. आपल्या देशात लोकशाही घटने प्रमाणे प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. तो ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागामध्ये त्याला मतदान करता आले पाहिजे म्हणून यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. या विषयासाठी ही बैठक आयोजित केली होती.

आम्ही निवडणूक आयोगाकडे निवेदन घेऊन पाठवणार आहोत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे सेक्शन वाइज मतदार याद्या बनवल्या तर अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतील. त्यांचा अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी आयुक्त आणि प्रांत काम करत असून यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

विधानसभा निवडणुकीच्या याद्या लोकसभा आणि महापालिका निवडणुकीला वापरल्या जातात. शहरामध्ये सतत मतदारांचे पत्ते बदलत राहतात. त्याचे पुरवणी यादीमध्ये नाव आल्यावर ते भलतीकडेच जाते. म्हणून या सर्व याद्या बदलून नव्याने याद्या बनवल्या पाहिजेत. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. असे झाल्यास काहीच अडचण येणार नाही. आता आम्ही या मता पर्यंत आलेलो आहोत, महापालिकेच्या याद्या प्रभागानुसार अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यासाठी निर्देश दिले पाहिजेत. सेक्शन वाइज् मतदार याद्या न करता प्रभागा नुसार याद्या निर्माण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केडीएमसी आणि प्रांताला दिल्या तर हा प्रश्न सुटेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com