डोंबिवली : डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डोंबिवलीत १५ तास पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून वेळेआधीच पाण्याचा साठा करून ठेवावा, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे..मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने महत्त्वाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मंगळवारी (ता. ९) डोंबिवलीच्या पूर्व आणि पश्चिम भागातील पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील..Navi Mumbai: लाइव्ह शो, स्पोर्ट्स आणि इव्हेंट्सचे नवे ठिकाण... नवी मुंबई देशाचं एंटरटेनमेंट हब बनणार! सिडकोचा भव्य एरिना प्रकल्प काय आहे?.मोहिली उदंचन केंद्रातून नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात (१५० दशलक्ष लिटर क्षमता) पाणी शुद्ध केले जाते. येथील पाणी पुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचे काम, फिल्टरबेड आऊटलेट जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अमृत-२ योजनेअंतर्गत खंबाळपाडा परिसरात उभारण्यात आलेल्या नवीन उंच जलकुंभाला मुख्य इनलेट जलवाहिनीशी जोडण्याचे महत्त्वाचे काम घेण्यात आले आहे. .तसेच डोंबिवली विभागातील वितरण व्यवस्थेतील आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे घेण्यात आली आहेत. या सर्व कामांसाठी नेतिवली जलशुद्धीकरण केंद्राचा १५ तासांचा 'शटडाऊन' घेण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे..Mumbai News: मुंबईच्या जलव्यवस्थापनाला बळ! सांडपाणी वाहतुकीसाठी नव्या ‘वॉटर टनेल'ला CRZ मंजुरी; कुठून कुठे असणार मार्ग?.मुंबईत १५ टक्के पाणीकपात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार (ता. ८) पासून २४ तासांसाठी १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे. कुलाबापासून ते दादर, माहीम, वांद्रे, अंधेरी, मालाड ते दहिसर, कुर्ला ते भांडुप या भागात पाणीकपात लागू असणार आहे..ठाणे शहरात ३ दिवस पाणीकपातठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १००० मिमि व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या कामांमध्ये शनिवार (ता. ६) रोजी नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे या दुरुस्तीसाठी ठाणे शहरातील अनेक भागात ३ दिवस ३० टक्के पाणीकपात असणार आहे. यादरम्यान, शहरात पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी गुरुवार (ता. ८) पर्यंत झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.