
मुंबई : चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेने १४ ठिकाणी लोकलच्या वेगमर्यादा शिथिल केल्या आहेत. २४ एप्रिल ते २५ जुलैदरम्यान या मर्यादांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे लोकल गाड्यांचा सरासरी वेग वाढणार असून, प्रवाशांना आपले नियोजित ठिकाण वेळेवर गाठता येणार आहे.