

Mumbai Local Train Knife Attack
ESakal
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे नेहमीच लोकलमध्ये गर्दी दिसून येते. यामुळे धक्काबुक्की किंवा इतर कारणांमुळे प्रवाशांमध्ये वाद,मारहाण होत असल्याच्या घटना समोर येतात. अशातच लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाल्याच्या रागात चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे.