Mumbai 7/11 Blast Case : मुंबई उच्च न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष का सोडलं? सुनावणीवेळी काय झालं?

Mumbai Train Blasts Case : मुंबईत १९ वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलीय. यातील काहींना मकोका न्यायालयानं फाशी आणि जन्मठेप सुनावली होती.
Mumbai 7/11 Blast Case: All Accused Acquitted by High Court | Full Verdict
Mumbai 7/11 Blast Case: All Accused Acquitted by High Court | Full VerdictEsakal
Updated on

Mumbai 7/11 Blast Case: मुंबईत २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानं देश हादरला होता. या स्फोटांमध्ये १८० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला तर ४०० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मकोका विशेष न्यायलयानं १२ जणांना शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ६ महिन्यांच्या सुनावणीनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलीय. तब्बल १९ वर्षांनी या प्रकरणी दोषी ठऱलेले आरोपी निर्दोष ठरवण्यात आले असून त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com