'मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी लोकशाहीचे मंदिर का बंद ठेवले'? संजय राऊतांचा भाजपला सवाल

'मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी लोकशाहीचे मंदिर का बंद ठेवले'? संजय राऊतांचा भाजपला सवाल

मुंबई -  कोरोना काळात राज्यात मंदिरे उघडण्याची भाषा करणाऱ्या भाजपने संसदेचे हिवाळी अधिवेशन का रद्द केले. लोकशाहीचे मंदिर का बंद केले आहे? अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. केंद्र सरकारने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे. त्यावर राऊत यांनी टीका केली आहे.

ऐन देशभरात सुधारित कृषी कायद्यांचा विषय पेटला असूनही केंद्र सरकारने कोरोनाचे कारण देत हिवाळी अधिवेशन रद्द केले आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, '' कोरोनाच्या नावाखाली संसदेचे हिवाळी अधिवेशन घ्यायचे नाही हे ढोंग आहे. भाजप सोयीनुसार लोकशाही, स्वातंत्र, आणिबाणीच्या वाख्या ठरवत आहे. राज्यात भाजपचे एक धोरण असते, देशात वेगळे असते . कोरोना हे जर संसदेचं हिवाळी अधिवेशन न घेण्याचं खरं कारण असेल. तर, बिहारची निवडणूक कशी झाली. बिहारमध्ये लाखोच्या सभा कशा झाल्या, बंगालमध्येही निवडणूकांसाठी जोरदार जमवाजमव सुरू आहे. एकीकडे राज्यातही मंदिरे उघडा, शाळा उघडा अमूक उघडा तमूक उघडा असे भाजपकडून केले गेले. मग त्यांनी हिवाळी अधिवेशन का रद्द केले.?''

' संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यामागे खरं कारण शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. सरकारला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. भाजप इतर मंदिरे खुली करण्याबाबत बोलतंय मग, लोकशाहीचं मंदिर का बंद ठेवलंय.? ' असा सवालही राऊत यांनी भाजपला केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com