कोणकोणत्या बंडखोरांना शिवसेनेचे दिलं अभय ?

कोणकोणत्या बंडखोरांना शिवसेनेचे दिलं अभय ?

मुंबई, ता. 16 : मतदानासाठी काही दिवस उरले असतांना उशिरा का होईना शिवसेनेला अखेर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला. शिवसेनेने आपल्या 14 बंडखोरांची हाकलपट्टी केली असली तरी मुंबईतील तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि संजय भालेराव यांना मात्र अभय देण्यात आलं आहे. यामुळे काही ठिकाणची बंडखोरी ही शिवसेना पुरस्कृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला काही दिवस उरले असले तरी शिवसेनेतील बंडखोरी शमण्याचं नाव घेत नाही. राज्यभरातील 30 पेक्षा अधिक बंडखोरांनी शिवसेनेच्या डोक्याला चांगलाच ताप केला आहे.या बंडखोरांना पक्ष नेतृत्वाने अनेक इशारे दिले पण या इशाऱ्यांना बंडखोरांनी भाव दिला नाही.सोलापूरच्या दौऱ्यावर असणाऱ्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना बंडखोरीचा सामना करावा लागल्यानंतर या बंडखोरांवर कारवाईचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला.यानंतर सोलापूरमधील बंडखोर महेश कोठे, मोहोळ मधील मनोज शेजवाळ, नांदेड दक्षिण मधील प्रकाश कौडगे,हदगाव मधील बाबुराव कदम यांच्यासह 14 बंदखरांची उद्धव ठाकरेंच्या आदेशाने हाकलपट्टी करण्यात आली.

शिवसेनेने राज्यभरातील बंडखोरांवर जरी कारवाईचा बडगा उगारला असला तरी मुंबईतील बंडखोरांना मात्र अभय दिलं आहे.शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना घाम फोडणाऱ्या वांद्रे पूर्व मधील तृप्ती सावंत, वर्सोवा मधील राजुल पटेल आणि घाटकोपर पश्चिम मधील संजय भालेराव या बंडखोरांवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.यामुळे ही बंडखोरी शिवसेना पुरस्कृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Webtitle : why shivsena did not take any action on these rebel sena candidate

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com