दिघा धरणाचा प्रश्‍न सोडवणार : आठवले

दिघा धरणाचा प्रश्‍न सोडवणार : आठवले
दिघा धरणाचा प्रश्‍न सोडवणार : आठवले

मुंबई : दिघ्यातील इलठणपाडा येथील ब्रिटिशकालीन खांडी धरण धोकादायक झाल्याने या ठिकाणी तिवरे धरणासारखी दुर्घटना घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील रिपाई युवक आघाडीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन, या धरणाचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली. या वेळी मंत्री रामदास आठवले यांनी रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करून दिघा येथील धरणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन युवक कार्यकर्त्यांना दिले.   

ब्रिटिशांनी रेल्वेच्या इंजिनला पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच पारसिक बोगदा तयार करण्यासाठी दिघा येथे दीडशे वर्षांपूर्वी खांडी धरण बांधले होते; मात्र गेल्या काही वर्षांपासून या धरणाची दुरवस्था झाली आहे. या धरणाला अनेक ठिकाणी तडे गेल्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. पावसामुळे सध्या हे धरण पूर्णपणे भरल्यामुळे या धरणाच्या आजुबाजूला राहणाऱ्या हजारो कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीचे नवी मुंबई युवा जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण मोरे, रिपाइंच्या आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन कटारे, दिघा विभागाध्यक्ष सागर सोनकांबळे, घणसोली विभाग अध्यक्ष संकेत पवार आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. 

यावेळी नुकत्याच घडलेल्या तिवरे धरणाच्या दुर्घटनेप्रमाणे या ठिकाणी दुर्घटना घडल्यास या ठिकाणी राहणाऱ्या हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मी स्वतः प्रश्नी लक्ष घालून रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करून दिघा येथील खांडी धरणाचा प्रश्न सोडवेल. असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शिष्टमंडळाला दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com